Du er ikke logget ind
Beskrivelse
*आयुष्य जगण्यासाठी रोजच्या चाकोरीतून वेळ काढून आपल्या आवडीला, छंदांना प्राथमिकता द्यावी हे सांगणाऱ्या कविता. *या कवितांच्या प्रवासात तुम्हाला मुरारीपण भेटेल आणि पार्थ ही, मुक्तछंद पण दिसेल आणि वृत्त बद्धता, इथे प्रेमाचा अनुभव येईल आणि निसर्गाचाही. नात्यांचा गुंताही कळेल आणि एकटेपणाचा आनंदही. वेगवेगळ्या विषयांवरील कविता तुम्हाला त्या त्या जगात पोहोचवतील. *नव्या पिढीने अजून जोमाने कवितेकडे वळावे हा मूळ हेतू श्री किरण ज्ञानदेव वेताळ यांनी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य शाखेची पदवी मिळवली. साहित्याचा प्रवास सुरू झाल्यानंतर रोटरी क्लब पुणे, बंधुता प्रतिष्ठान विचार वेध संमेलन पुणे, सुरेश भट जागतिक काव्यलेखन स्पर्धा नागपूर, ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन काव्यमंच पिंपरी चिंचवड, कलाश्री प्रतिष्ठान पुणे, पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेची काव्यरत्न स्पर्धा, अग्निहोत्र ट्रस्ट पुणे काव्य संमेलने अशा प्रकारच्या अनेक स्पर्धा व संमेलानतून सहभाग घेऊन विविध पारितोषिके मिळविली. साहित्य समूहांवर लेखन करत असतानाच मायबोली आणि मिसळपाव अशा मराठी साहित्याच्या वेबसा